जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा येथे व्याख्यानाचे
आयोजन
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रानमळा येथे
दिनांक १/९/२०१८ रोजी WOTR संस्थेच्या
सहकार्याने मातीचे संवर्धन व पाणी बचतीचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
केले होते. यावेळी WOTR संस्थेचे श्री. शेळके साहेब ,
श्री.विजय फलके तसेच त्यांच्या टिम मधील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी शाळेचे
उपाध्यापक श्री. नरसाळे सर यांनी सर्वप्रथम आलेल्या पाहुण्यांचे स्वागत
केले. त्यानंतर श्री. शेळके साहेब यांनी विद्यार्थ्यांना मातीचे संवर्धन
कशा प्रकारे केले पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे
पाण्याचे आपल्या जीवनातील महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. पाण्याशिवाय आपली
सजीव सृष्टी जगू शकत नाही. त्यामुळे पाण्याचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे.
पाण्याचा अपव्यय थांबवला पाहिजे.
त्यानंतर शाळेने सामाजिक बांधिलकी म्हणून गावातून
प्रभात फेरी काढली. यावेळी विद्यार्थ्यांच्या घोषणांनी गावातील परिसर दुमदुमून
निघाला होता. यावेळी “जल है तो कल है”
; “ पाणी अडवा, पाणी जिरवा” यासारख्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर WOTR संस्थेमार्फत शाळेतील सर्व
विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री.
रोहोकले सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment